पण राघव आता
मोठा झालाय. नवीन कॉलेजमध्ये त्याच्या जुन्या मित्रांपैकी कुणी नाही. इथे सगळे
आपापलं बघतात. हे असं इतरांसारखी सामान्य वागणूक मिळणं त्याच्या पचनी पडत नाहीये.
सध्या राघवाचा फोकस आपल्यातली कमतरता ओळखण्यापेक्षा इतरांमधल्या ताकदीचा तिरस्कार
करण्याकडे आहे. आपल्यावर किती अन्याय होतो याचं तो चवीचवीनं वर्णन करत असतो. पण
त्यामुळे तो अगदी एकटा पडलाय.
याचा नात्यांवरही
परिणाम झालाच. राघवला मेघा खूप आवडली होती. त्यानं तिला प्रपोज केलं. सुरुवातीला राघवचं तिच्यावर अवलंबून राहणं, सारखी त्याची काळजी घेणं मेघानं एन्जॉय केलं, पण
लवकरच ती कंटाळली. ‘नेहमी सगळं तुझ्या सोयीनंच कसं रे? माझा काहीच विचार करत नाहीस
तू.’ अशा अतिशय बिटर नोटवर त्याचं ब्रेक अप झालं. आपल्यावर सतत अन्याय होतो हा
राघवचा समज या सगळ्यातून जास्तच पक्का झाला. ‘लाईफ इज नॉट फेअर!’ हे त्याचं घोषवाक्य बनलं.
आपल्यामधल्या
कमतरतेचं भांडवल करणारे राघवसारखे हे लोक सतत इतरांकडून सहानुभूती मिळवण्याचा
प्रयत्न करतात. स्वत:मधेच इतके मश्गुल असतात की बाकीच्यांच्या आनंदाशी किंवा
दु:खाशी त्यांना काही देणंघेणं नसतं. एखादी गोष्ट जमली नाही, अपयश आलं की यांची
कुरकुर सुरु होते, ब्लेम गेम सुरु होतो, तक्रार चालू होते. त्यामुळे ते कायमच
बाकीच्यांवर ओझं बनून राहतात. इतरांचं काही भलं झालं की यांचा पोटशूळ उठतो.
ईर्ष्येनं आणि जेलसीनं त्यांचा जळफळाट होतो.
तुम्हांला नाही वाटत राघव खूप काही मिस करतोय असं? चॅलेन्जेस घेणं, त्यांच्यावर मात करण्यासाठी मनापासून लढणं,
काहीवेळा सणकून आपटी खाणं आणि त्यातूनही ताठ उभं राहणं हे किती इंटरेस्टिंग असतं!
पण यातलं काहीच अनुभवत नाहीये तो. आयुष्य अगदी मिळमिळीत झालंय त्याचं. इतरांकडून
अपेक्षा करता करता तो हे विसरलाय की त्याच्या जीवनाचा शिल्पकार तोच आहे. सेल्फ पिटी मध्ये तो इतका बुडलाय की रिअॅलिटीला
तोंड कसं द्यायचं असतं हेच विसरलाय. डोळ्यावरची झापड निघाल्याशिवाय त्याला ही रिअॅलिटी
लख्ख दिसणार नाहीये. आणि ती दिसल्याशिवाय समोरचा करेक्ट मार्ग दिसणार नाहीये. त्याच्यावर
प्रेम करणाऱ्या सगळ्यांनीही आपापल्या
डोळ्यावरची मायाळू पट्टी काढायला हवी. कारण त्याला इतकं जपून आपण खरंतर
त्याच्यावर अन्याय करतोय, त्याला खूप डिपेंडंट बनवतोय. लाईफ इस नॉट फेअर हे जरी
खरं असलं तरी ते सगळ्यांसाठीच तसं असतं, त्याच्या एकट्यासाठी नव्हे.
एकापाठोपाठ घडणाऱ्या या घटनांमुळे
राघव जेव्हा डिप्रेशन मध्ये जायला लागला तेव्हा त्याच्या बहिणीनं सूत्रं हातात
घेतली. मोठ्या मुश्किलीनं तिनं त्याला मानसतज्ज्ञाकडे जायला राजी केलं. तिथे दुसऱ्यांच्या
दृष्टीकोनातून त्यानं प्रथमच स्वत:कडे पाहिलं. आपण पुन्हा पुन्हा अपयशी का होतोय
हा प्रश्न त्यानं स्वत:ला विचारला आणि त्याची सुधारणेला सुरुवात झाली. आपली नजर इतरांविषयीच्या
तक्रारीकडून काढून घेऊन आपल्या आत डोकावून बघण्यासाठी तो जेव्हा वापरायला लागला,
तेव्हा जादू झाली! त्याला जगायला चक्क मजा यायला लागली! या नवीन, हस-या , कुरकुर न
करणा-या राघवला पाहून आता सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसायला लागलाय.
No comments:
Post a Comment