Wednesday, 22 January 2020

ताणतणावांच्या पलीकडे

( published in Loksatta Viva Dec 2017)

युवा मित्र-मैत्रिणींनो,
गेले वर्षभर आपण तुमच्या आयुष्यातल्या वेगवेगळ्या चॅलेंजेसविषयी गप्पा मारल्या. कॉलमचा विषयच होता ताणतणाव! आणि ताणतणाव म्हटलं की त्यात बरंच काही येतं. कारण ताणाची कारणं आणि परिणाम दोन्हीही असंख्य आहेत. आपल्या रोजच्या जीवनातली जवळजवळ प्रत्येक गोष्ट आपल्याला ताण देऊ शकते. अगदी सकाळी उठण्यापासून ते रात्री शांत झोप लागेपर्यंत. त्यामुळे मैत्री, प्रेम, व्यसनं, नोकरी, भावना, नाती इथपासून ते ट्रॅफिक, लैंगिकता, सोशल मीडिया, लग्न असे अनेक विषय यात आपोआपच आले.

तुमची सगळी पिढी एका मोठय़ा बदलाच्या लाटेतून जातेय. हा बदल महाकाय आहे आणि फार वेगवानही आहे. इतका वेगवान की तो आपल्याला विचार करण्याएवढाही अवधी देत नाही. त्यावर काही स्ट्रॅटेजी प्लॅन करायला उसंत देत नाही. किंबहुना ही सगळी विचार वगैरे करण्याची गरजच मुळी तुम्हाला वाटत नाही. जे काही पुढय़ात येईल त्याला तोंड द्यायची तुमची तयारी आहे. त्या वेगाची झिंग चढल्यासारखी झालीये. अर्थातच, त्यामुळे त्याच्या परिणामांकडे लक्ष द्यायला सवड नाहीये. पण म्हणून ते परिणाम व्हायचे राहतात थोडेच! या आपल्या लाइफस्टाइलचा आणि तणावांचा थेट संबंध मात्र जोडता येत नाही. सतत अस्वस्थ व्हायला होतं. कसलीतरी हुरहुर जाणवत राहाते. कितीही मिळालं, कितीही मजा केली तरी आणखी काहीतरी हवं असं वाटत राहातं. भरपूर मित्रमैत्रिणी असूनही एकटं वाटतं. एकाकीपणातून येतं नैराश्य आणि त्यातून घडतात आत्महत्या.

तुमच्यात असलेली ती सळसळती ऊर्जा, ते कुतूहल, ती ताकद, तो उत्साह यांचा तुम्हाला तरी अंदाज असतो की नाही कोण जाणे. खरंतर त्यातून खूप काही घडू शकतं. नुसत्या तुमच्या स्वत:च्या आयुष्यातच नव्हे तर सगळ्या समाजात, देशात, जगात! आपल्याला खूप काही करता येईल, आपल्या कोशातून बाहेर येऊन आपल्या ऊर्जेचा इतरांसाठी वापर करता येईल. पण ठेवतो का आपण हा काहीसा विशाल दृष्टिकोन?
रामदास स्वामींची ही गोष्ट तुम्ही ऐकली आहे की नाही माहिती नाही. सांगू?
ते लहान असताना एकदा आईला सापडेचनात. ती त्यांना घरभर शोधून थकली, शेजारीपाजारी पाहिलं. शेवटी छोटा रामदास कुठे सापडला माहितेय? एका भिंतीतल्या कपाटात, फडताळात! आईने विचारलं, ‘अरे, इथे काय करतोयस?’ त्यांनी उत्तर दिलं, ‘चिंता करतो विश्वाची!’ इतक्या लहानपणी ही विश्वाची, साऱ्या जगाची चिंता त्यांना सतावत होती. जगाच्या कल्याणासाठी काय करता येईल यासाठी ते विचार करत होते. फक्त मी, माझं या चक्रात अडकलेले नव्हते.

हा असा इतरांचा विचार करणं हीच असेल का तणावांवर मात करणारी जादूची छडी? आपण करतो का असा विचार? तुम्हाला काय वाटतं, बघता येईल स्वत: पलीकडे जाऊन? आपल्या चिंता सतत भिंगातून बघून आपल्याला इतक्या मोठय़ा वाटायला लागतात की त्याशिवाय दुसरं काही दिसेनासं होतं. ते भिंग बाजूला करून पहायचं का? तसं करता आलं तर आपले कितीतरी ताण या जादूसारखे नष्ट होतील. विरघळून जातील. ते किती किरकोळ आहेत हे लक्षात येईल. मग कदाचित आपण त्यांना अवास्तव महत्त्व न देता त्यांची योग्य जागा त्यांना देऊ शकू.

आपल्या आयुष्याकडे डोळे उघडे ठेवून पाहिलं तर दिसतं की कितीतरी न पटणाऱ्या गोष्टी आपण उगीचच करत असतो. पण काय करावं हे सुचत तरी नसतं किंवा तसा विचारच केलेला नसतो. म्हणून नाइलाजानं आपण मळलेल्या वाटा चोखाळत राहतो. सगळे करतायेत म्हणून या अशा आपल्याला न पटणाऱ्या गोष्टींमध्ये आनंद मिळवायचा असफल प्रयत्न करत राहायचं की आनंदाचे आपापले मार्ग शोधायचे? इतरांबरोबर फरफटत जायचं की आपल्या विचारांशी जुळणारे दोस्त निवडायचे? सतत अस्वस्थ राहायचं की समाधानाचं गुपित शोधायचं? कोणीतरी कधीतरी काहीतरी वेगळा विचार केला म्हणूनच नवनवीन गोष्टींचा शोध लागला. मग आपणच का होऊ  नये तो वेगळा विचार करणारे? शिकायचं का जगाकडे, स्वत:च्या आयुष्याकडे जरा वेगळ्या नजरेनं पाहायला?

आपला पुढचा लेख या मालिकेतला शेवटचा लेख असणारेय. आणि खरंतर तो तुम्ही लिहावा असं मला वाटतंय. कारण आपल्या ताणासाठी आपण काय करू शकतो, हे तुम्हीच शोधून काढू शकाल. त्यासाठी मदत नक्की मिळेल चारी दिशांनी. तुमचे दोस्त, आई-बाबा, भावंडं, शिक्षक, माझ्यासारखे डॉक्टर्स, पुस्तकं आणि लास्ट बट नॉट द लीस्ट, ‘गूगल’! पण या सगळ्या सल्ल्याचा फारतर दिशादर्शक म्हणून उपयोग होईल. उत्तरं स्व:हून शोधून काढली तरच ती वापरतो आपण.
मग सांगाल का या ताणतणावांवरचे तुमचे खास उपाय?

Sunday, 12 January 2020

गेमिंगचा विळखा (डॉ. वैशाली देशमुख) - https://www.esakal.com/saptarang/saptarang-pubg-game-and-mobile-game-article-write-dr-vaishali-deshmukh-217432

Saturday, 11 January 2020

थँक यू!



उन्हाळ्यातली एक प्रसन्न सकाळ. जय उत्साहात जागा झाला. त्याला आठवलं, आज दहा मे, त्याचा तेरावा वाढदिवस! आता तो टीनएजर होणार. खूप बेत आखले होते त्यानं  या दिवसासाठी. तोंड बिंड धुवून तो ब्रेकफास्ट ला आला. ताज्या केकचा मस्त वास सुटला होता. आई सकाळ पासून कामाला लागलेली दिसतेय. तेव्हढयात नेहा, त्याची धाकटी बहिण, जिन्यावरुन दडदडत आली आणि त्याच्या पाठीत धबका मारत म्हणाली, 'happy birthday, दादा! हं, हे घे. मी तुझ्यासाठी ग्रीटिंग कार्ड बनवलंय.' त्याच्या हातात एक रंगीत कार्ड देत नेहा म्हणाली. ‘हे बघ नेहा, आज माझे सगळे मित्र-मैत्रिणी येतायत. तू अजिबात मध्ये मध्ये करायचं नाहीस, कळलं?’ नेहा बघतच राहिली. थँक यू वगैरे म्हणायचं सोडून हे काय?

दिवसभर जयची नुसती चंगळ होती. आजी-आजोबा त्याच्यासाठी खास मिठाई घेऊन आले. काकांनी शर्ट आणला. आणि आई-बाबांनी चक्क गिअरची सायकल! कितीतरी दिवसांपासून त्याला गिअरची सायकल हवी होती. संध्याकाळी सगळ्या मित्र-मैत्रिणींनी मिळून धमाल केली. जयचा आवडता पिझ्झा मागवला आणि केक कापला.

तरीही रात्री झोपताना जय तसा अस्वस्थच होता. कसलीतरी रुखरुख लागली होती त्याला. कसली, ते मात्र कळत नव्हतं. खरंतर संध्याकाळी पार्टी जोरात झाली होती. पण जयचा सगळ्यात जिगरी दोस्त मात्र काही कारणानं आला नव्हता. ‘एवढं काय महत्त्वाचं काम निघालं असेल? आणि गिफ्ट्सचं म्हणाल तर काही फार खास नव्हत्या त्या. काकांनी आणलेला शर्ट पिवळ्या रंगाचा होता! पिवळ्या रंगाचा शर्ट कुणी घालतं का? आणि आजीआजोबांना माहिती नाही का त्याला मिठाई आवडत नाही ते? बरं, ती सायकल तरी मनासारखी मिळाली असती तर बरं झालं असत. तर तेही नाही. वर आई-बाबांच्या सारख्या सूचना चालूच. अरे, मी टीनएजर झालोय आता, कुक्कुलं बाळ नाहीये. किती कटकट कराल?’ जयच्या मनात विचारांच्या लाटांवर लाटा फुटत होत्या. काहीशी उशीराच झोप लागली त्याला.

सकाळी सकाळी जयला जाग आली ती सन्मयच्या हाकांनी. ‘जय, अरे येतोयस ना? का विसरलास आपल्या ट्रेकचं? चल लवकर.’ नित्या, बेला आणि रेहानही  आले होते. ‘आणि सॉरी रे, काल येता नाही आलं. मला पण इतकं वाईट वाटत होतं ना!’ सन्मय जयला म्हणाला. तेवढ्यात जयची आई म्हणाली, ‘जयचा ब्रेकफास्ट व्हायचाय अजून. तुम्ही पण खाऊन घ्या थोडं थोडं. मी खिचडी केलीय मस्त.’ काकूंची खिचडी फेमस होती एकदम. त्यामुळे कुणी नाही म्हणायचा प्रश्नच नव्हता. आणि नाहीतरी इथे कुणाला घाई होती? वेळच वेळ होता त्यांच्याकडे.

भरपेट खिचडी खाऊन ते जेव्हा टेकडीवर पोचले तेव्हा सूर्य चांगलाच वर आला होता. क्रिकेट खेळणारी सात-आठ मुलं सोडली तर तसा शुकशुकाटच होता. लांबून येणारे गाड्यांचे आणि हॉर्नचे आवाज मधूनच ती शांतता चिरत होते. एका प्रशस्त पारावर त्यांनी अड्डा टाकला. मस्त गार वारा सुटला होता. त्या क्रिकेट खेळणा-या मुलांकडे जय निरुद्देशपणे बघत बसला. एक तुटकी बॅट आणि जुनाट बॉल घेऊन त्यांचा खेळ चालला होता. एक मुलगा तर अनवाणी पायांनी खेळत होता. पण धम्माल चालली होती त्यांची. आरडा-ओरडा करत, टाळ्या वाजवत ते खेळाची पुरेपूर मजा लुटत होते. एकदा तर एका मुलानं असा काही कॅच घेतला की बस! आता मात्र जयला रहावलं नाही. ‘आम्ही पण येऊ का रे खेळायला?’ त्यानं विचारलं. ‘या की, आपण मोठ्या टीम्स करू.’

त्यांचा खेळ थांबला तेव्हा दुपार झाली होती. सगळे घामानं भिजून चिंब झाले होते. त्यांचे चेहरे उन्हानं आणि खेळण्याच्या श्रमानं लालेलाल झाले होते. घामेजलेल्या केसांतून गार वा-याची झुळूक गेली की गुदगुल्या होत होत्या. पुन्हा भेटण्याचं ठरवून ते निघाले. परत येताना जयच्या चेह-यावर हसू होतं. त्याला खूप छान मोकळं मोकळं वाटत होतं. त्यानं मान वर करून पाहिलं. आकाश एकदम स्वच्छ निळं दिसत होतं. टेकडीवरची गर्द झाडी डोळ्यांना थंडावा देत होती. दुरून कोकिळेची कुहू कुहू ऐकू आली. बरोबर हसत खेळत, गप्पा मारत चाललेल्या दोस्तांकडे पाहून त्याची कालची अस्वस्थता कुठच्या कुठे पळून गेली. घरी पोचेपर्यंत तो मस्त मूडमध्ये आला होता.

आल्या आल्या अंगणात उभी असलेली नवी सायकल दिसली. ‘त्यावर चक्कर मारायला काय मजा येईल!’ त्याला वाटलं. हॉलमध्ये बसलेल्या बाबांनी त्याला विचारलं, ‘काय रे, सायकलचं मॉडेल आवडलं नाही का तुला? फारसा खूष दिसला नाहीस काल. मी दुकानदाराला सांगून ठेवलंय, तो बदलून देईन म्हणालाय.’ जय गडबडून म्हणाला, ‘अं, नाही, तसं काही नाही. चांगली आहे की सायकल. मी चालवून बघतो एकदा, मग बघू.’

रात्री जेवताना नेहा जरा गप्प गप्पच होती. तिला जरा बरं वाटावं म्हणून जय म्हणाला, ‘नेहा, काय मस्त ग्रीटिंग कार्ड केलंस गं. अगं पुढच्या आठवड्यात बेलाचा वाढदिवस आहे. तिच्यासाठी मला करून देशील का एक कार्ड? तुला माहितेय माझी दिव्य चित्रकला!’ नेहा खुदकन हसली आणि कार्ड बनवायला आनंदानं तयार झाली.

त्या रात्री झोपायला गेल्यावर जयच्या डोक्यात आजच्या सबंध दिवसाचं चित्र उभं राहिलं. ती टेकडी, त्यावर खेळलेली ती एक्सायटिंग मॅच, ते नवीन मिळालेले मित्र, तो गार वारा; सगळं त्याला लख्ख आठवलं. ती मुलं किती वेगळी होती खरंतर! पण मजा मात्र तितकीच जबरदस्त आली. एखाद्या मोडक्या बॅटनं खेळायला इतकी धमाल येते याची त्यानं कधी कल्पनाही केली नव्हती. कालच्यासारखीच आजही त्याला झोप येत नव्हती पण त्याचं कारण मात्र वेगळं होतं. आज तो विचार करत होता कालच्या रुखरुखीबद्दल. ‘तसं काही कारण नव्हतं आपल्याला नाराज व्हायला. घरच्यांनी प्रेमानं दिलेल्या भेटींना आपण उगीचच नाकं मुरडली. आणि नेहाशीसुद्धा किती उद्धटपणे बोललो!’ त्याला त्याचं प्रेमळ कुटुंब आठवलं, प्रशस्त शाळा आठवली. जिवाभावाचा मित्र आठवला. मिळालेल्या भेटवस्तूंचा ढीग डोळ्यासमोर आला. ‘खरच, किती नशीबवान आहोत आपण!’ आज तो या सगळ्याकडे एका निराळ्याच स्वच्छ दृष्टीनं बघत होता. कसं काय शक्य झालं हे? हं, नक्कीच त्या टेकडीवरच्या मुलांनी काहीतरी जादू केली असणार. त्यांचा उत्साह बघून तर त्याला कळलं की छोट्या छोट्या गोष्टीतही कसा आनंद घेता येतो! त्यानं एक लांबलचक सुस्कारा सोडला आणि मनापासून म्हटलं, ‘थँक यू!’ आता जयचं मन आनंदानं आणि कृतज्ञतेनं काठोकाठ भरलं होतं. कधी अलगद झोप लागली ते त्याला कळलंही नाही.

THINK before you post!


A chat on WhatsApp can land you in jail! Do be careful about what you post! Use THINK formula before sending any electronic message (source- http://goo.gl/Ou46Uh ). Ask yourself a few questions before hitting the 'send' button.

T- Is it true?
H- Is it hurtful?
I- Is it illegal?
N- Is it necessary?
K- Is it kind?

एका रेल्वेप्रवासाची चित्तरकथा



स्थळ- रेल्वेस्टेशन, रेल्वे
पात्रे- तिकीट चेकर, किशोरवयीन मुले-मुली, सहप्रवासी

( सुहास आणि त्याची दोस्तमंडळी सुट्टीमध्ये एका छोट्या ट्रीपला चालली आहेत.)

सुहास- ( रेल्वेस्टेशनमधल्या गर्दीतून वाट काढत ) अरे, पटापट चला जरा. अजून आपल्याला कुठल्या प्लॅटफॉर्मवर गाडी लागणार आहे तेपण शोधायचंय.

विशू- हो ना, तरी मी सांगत होतो अर्धा तास आधी पोचायला हवं म्हणून. ही अस्मी नेहमी उशीर करते.

अस्मी- बरं बाबा, तुझंच बरोबर! आता चालणार आहेस की असाच कीस पाडत बसणार आहेस?

हमाल- ओ ताई, द्या हिकडं ती ब्याग. कुटली गाडी हाय?  म्या देतो बसवून.

सुहास- नको दादा, आम्ही जाऊ. थँक यू.

(एकदाचे प्लॅटफॉर्मवर पोचून डब्यात शिरतात.)

जितू- अरे काय हे सुहास, एक जागा इकडे आणि बाकी सगळ्या तिकडे? तू नीट बघितलं नाहीस का बुकिंग करताना?

अनू- असू दे रे. सगळे आले ना, की करू आपण अॅड्जस्ट.

विशू- (किंचाळून) ईsss इथे झुरळ आहे! मी नाही बसणार इथे.

( सगळे हसतात)

काका (सहप्रवासी)- घाबरू नकोस बाळ, ये, तू इकडे बस.

( विशू एकटाच इतरांपासून वेगळा बसतो. थोड्या वेळाने... )

विशू- आsss वाचवा, वाचवा!

अनू- काय चाललंय काय आज विशू तुझं? किंचाळतोयस का सारखा?

विशू- अगं, हे काका बेशुद्ध पडलेत बहुतेक.

अनु- काहीतरी काय? ते गाढ झोपलेयत आणि घोरतायत. (त्यांना हलवून) हे बघ, जागे झाले. सॉरी काका. काही नाही, झोपा तुम्ही.  चल विशू, तू इकडे ये बघू. आम्ही पत्ते खेळतोय.

(सगळेजण पत्ते खेळण्यात गुंग होतात. बरोबर आणलेल्या खाऊची देवाण-घेवाण होते. बराच वेळ जातो, काही स्टेशन्स येऊन जातात. तिकीट चेकर येतो)

सुहास- हं, ही आमची तिकीटं.

तिकीट चेकर- तुमचं स्टेशन गेलं की मागे. उतरला नाहीत का तुम्ही? चला, आता येणा-या स्टेशन वर उतरून घ्या.

जितू- क- क्काय? उतरून घ्या म्हणजे? सांगितलं का नाही कुणी आम्हांला? इथे उतरून काय करू आम्ही? ए, आपण चेन खेचायची का?

सुहास- जितू एक मिनिट. काका, ही गाडी परत येते का या मार्गानं? जायचं कसं मागच्या गावात आम्ही?

तिकीट चेकर- हे बघा, मला ते काही माहिती नाही. हे आलं स्टेशन. पटकन उतरून घ्या. नाहीतर दंड भरायला लागेल विना तिकीट प्रवास केला म्हणून.

(सगळेजण त्या सुनसान स्टेशनवर गोंधळून उभे)

अस्मी- बाप रे, काय करायचं आता? मला फार भीती वाटतेय. कसली भयानक जागा आहे ही! बसा आता इथेच डोक्याला हात लावून. मी काही कुठल्या अनोळखी लोकांशी बोलणार नाही बुवा. शी:, सगळी ट्रीप वाया गेली.

मीता- ए अस्मी, अगं उलट खूप मज्जा येईल. मला तर आपण त्या फेमस फाईव्ह सारखं काहीतरी धाडस करतोय असं वाटायला लागलंय.

चिनू- जे काही असेल ते असेल, पण आपल्याला काहीतरी करायला हवं आता. कुणालातरी विचारायचं का? पण इथे तर काळं कुत्रं पण दिसत नाहीये. काय स्टेशन मास्तर वगैरे नाहीयेत का इथं? ए अरे सुहास, बघ ना काहीतरी.

विशू- हो रे सुहास. एकतर ही सगळी आयडिया तुझी होती. आणि तुम्हांला माहितेय का, आपल्याला फोनही करता येणार नाहीये कुणाला. सुहास साहेबांनी फोन न आणण्याचं फर्मान काढलं होतं ना, त्यामुळे आपण कुणीच आणले नाहीयेत.

सुहास- सॉरी विशू, अरे मला वाटलं आपली ट्रीप गॅजेट-फ्री असावी. त्यातल्या त्यात एक गोष्ट बरी आहे, आपण एका रेल्वे स्टेशन वर आहोत, कुठेतरी वाळवंटात नाही. सापडेल काहीतरी मार्ग.

अनु- सुहास, थँक्स. कुणीतरी जरा बरा विचार करतोय हे बघून मला बरं वाटलं. चला, त्या स्टेशन मास्टरना शोधूया आणि परतीच्या ट्रेनची चौकशी करूया. इथे थांबून काय करणार? किंवा आपल्याला एखादी एस टी बस वगैरे मिळू शकेल. नाहीतर लिफ्ट मागू कुणाकडे तरी.

चिनू- लिफ्ट? तसलं काहीतरी करायचं असेल तर जरा नीट बघून घ्यायला हवी हं. माझा मावसभाऊ असाच एकदा कुणाच्यातरी गाडीत बसला तर त्या लोकांनी त्याला सरळ लुटलं!

जितू- हं, आणि परत जायला हरकत नाही पण मग आपली पिकनिक राहून जाईल. त्यापेक्षा असं करायचं का? इथेच करू पिकनिक. आपल्याकडे भरपूर खाऊ आहे. मस्तपैकी शेतात हिंडू आणि मजा करू.

मीता- हेच म्हणायचं होतं मला. ती बघ, तिकडे एक आमराई दिसतेय. मस्त गार सावली आहे. त्या मालकांना शोधूया. त्यांची परवानगी पण घेता येईल आणि ते आपल्याला काही मदतही करतील.

सुहास- अरे वा, भरपूर आयडियाज जमा झाल्या की! मजा येईल आमराईत पिकनिक करायला. फक्त त्याआधी परतीच्या ट्रेनची चौकशी करून ठेवू. अंधार पडायच्या आत घरी पोचायला हवं ना! स्टेशन मास्टर आलेले दिसतायत, मी बोलून येतो त्यांच्याशी. तोपर्यंत तुम्ही जरा बघाल का आपल्यापाशी पैसे किती आहेत ते?

(सुहास स्टेशन मास्टर शी बोलून परत येतो)

गुड न्यूज! चार वाजता एक ट्रेन आहे. म्हणजे आपल्याला मनसोक्त हिंडून साडेतीन पर्यंत परत आलं तरी चालेल. नशिबानं त्यांच्याकडे फोन होता आणि त्यांनी मला तो वापरू दिला. मी बाबांना कल्पना दिलीय आपण इथे आहोत म्हणून. ते कळवतील तुमच्या आई-बाबांना. चला तर मग आमराईकडे! लेफ्ट-राईट-लेफ्ट!

(साडेतीनला सगळे स्टेशनवर परत आलेत. हसणं-खिदळणं, मस्ती चालू आहे.)

चिनू- आsssहाहा, इथेच ताणून द्यावीशी वाटतेय मला. काय मस्त आंबे होते! ते काका किती चांगले होते ना! त्यांनी आपल्याला चक्क वाट्टेल तितके आंबे खा म्हणून सांगितलं.

मीता- हो ना, कोणी इतकं उदार कसं असू शकतं? बाप रे, कित्ती हसलो आपण! आणि केव्हढी गाणी म्हटली! माझा तर घसाच दुखायला लागलाय. पण मजा आली खूप. तुमच्या लक्षात आलं का, मोबाईल फोन्स नसल्यामुळे आपण एकही फोटो काढला नाही की गाणी लावली नाहीत. मला चक्क पक्षांची किलबिल आणि कोकिळेचं कुहू कुहू ऐकू येत होतं.

अस्मी- मी मस्त सुगंधी हवा भरून घेतली छातीत. काय झुळूझुळू वारा वाहत होता! बेस्ट पिकनिक झाली आजची. माझे शब्द परत घेते मी. विशू, तू पण जरा सॉरी म्हण सुहासला.
ही बघा, आलीच ट्रेन.

(काही दिवसांनी सगळे चिनूच्या दादाला हा अनुभव सांगतात)

दादा- (कौतुकानं) अरे, कसले भारी आहात तुम्ही! तुम्ही चक्क POWER नावाचा जीवनकौशल्याचा फंडा वापरलात!

विशू- हो का? काय असतं ते? आम्ही तर फक्त तावातावानं वाद घातले आणि भांडलो.

दादा (हसून)- मी सांगतो हे काय असतं ते. कुठलाही प्रॉब्लेम सोडवण्यासाठी हे POWER नावाचं मॉडेल उपयोगी पडतं. यातला P म्हणजे काय प्रॉब्लेम आहे हे शोधून काढणं. O म्हणजे ऑप्शन अर्थात पर्याय. मग हे पर्याय Weigh करायचे, म्हणजे त्यांच्या ब-या-वाईट पैलूंचा आढावा घ्यायचा. पुढचं E म्हणजे Elect आणि Execute, म्हणजे त्यातला योग्य पर्याय शोधून वापरायचा. शेवटचा R आहे Review साठी. आपण निवडलेला पर्याय बरोबर होता का नाही यावर विचार करणं.
बघा, तुम्हांला नाही वाटत तुम्ही तुमच्याही नकळत या पाय-या वापरल्यात म्हणून?

सुहास- अं, पटतंय मला तुझं. जरा बघूयात का? आमचा प्रॉब्लेम असा होता की आम्ही एका अनोळखी जागी चुकून पोचलो होतो. आमच्या प्रतिक्रिया वेगवेगळ्या होत्या. काहीजण रागावले, काहीजण रुसले तर काहींना चक्क आनंद झाला. त्यामुळे प्रत्येकानं पर्यायही निरनिराळे सुचवले. उदा. हताश होऊन स्टेशनवरच बसून राहावं, परतीच्या बसची किंवा ट्रेनची सोय करावी, कुणाकडून तरी लिफ्ट घ्यावी किंवा तिथेच कुठेतरी पिकनिक करावी. 

जीतू- पण स्टेशन वर बसून राहण्यानं उलट आम्हांला आणखी वाईट वाटत राहिलं असतं. ताबडतोब परतलो तर पिकनिकच्या मजेवर पाणी सोडायला लागलं असतं. कुणा अनोळखी व्यक्तीकडून लिफ्ट मागणंही तसं धोक्याचंच होतं. आणि मोबाईल फोन नसल्यामुळे इंटरनेटचा आधार घ्यायचा प्रश्नच नव्हता. त्यातल्या त्यात सुरक्षित आणि योग्य पर्याय तिथे पिकनिक करण्याचा होता, तो आम्ही निवडला. 

सुहास- हो, आणि नशिबानं आम्ही बाबांना कळवू शकलो, त्यामुळे आमचं टेन्शन कमी झालं. मोबाईल फोन न नेण्याचा निर्णयही शेवटी फायद्याचाच ठरला कारण आम्हांला त्या सगळ्या वातावरणाचा नीट अनुभव घेता आला.

चिनू- एकूण काय, आम्ही परफेक्ट निर्णय घेतले म्हणायचे! एकदम खास झाली आमची पिकनिक.

दादा- हं, आता विसरू नका हे POWER मॉडेल. हा जादूचा मंत्र वापरून तुम्ही कुठल्याही समस्या सोडवू शकता.  मग ते करियर निवडणं असो की परीक्षेची तयारी असो; मित्राशी झालेलं भांडण असो की अगदी आज कुठला ड्रेस घालू असा पडलेला प्रश्न असो.

प्रिय वाचकमित्रांनो, हा आहे तुमच्यासाठी एक प्रॉब्लेम. तुम्हांला परीक्षेत अपेक्षेपेक्षा खूप कमी मार्क्स पडलेत आणि आता तुमचे मित्र तुम्हांला भेटायला येणार आहेत. कसं तोंड देणार त्यांना? सांगाल की सांगणार नाही? असेल तर कसं? लक्षात ठेवा, त्यातल्या प्रत्येक पर्यायाची काहीतरी किंमत भरायला लागणार आहे आणि तसेच त्यांचे काही फायदेही असणार आहेत. चालवा डोकं आणि शोधा पर्याय!




Is it Loneliness, is it Solitude?!



(Published in Chhaatraprabodhan)
Dr Vaishali Deshmukh


  Jui went for a Himalayan trek during the holidays. Even though she was with a group of trekkers, she spent a lot of time alone, appreciating the nature, enjoying the quiet beauty of the ancient landscape. It was her first time in the mountains, and she thoroughly enjoyed the solitude.

  Gandhaar is shifting to a new city. Ever since his father announced about the transfer, he is a bundle of nerves. ‘I am dreading this. I find it very difficult to make new friends. I fear I will be lonely there.’

  Do you see the difference between the two situations? Jui is happy to be alone whereas Gandhaar dreads being lonely! Why do some people become lonely and some don’t?

  Being alone is not always unwanted. It may be a choice. In fact, some people love being away from the crowd. It can be a good break from the hectic routine, a rejuvenating interlude. In such situations, not only are we more assertive and more creative, but can make decisions without any peer pressure. You have probably heard of the famous song written by Gurudeo Rabindranath Tagore, ‘Ekla Chalo Re’. It says that if you are sure of your own path and destination, then even if no one follows you, walk alone!

  But not everyone can enjoy being alone. Loneliness is actually a state of mind, a feeling. And that’s why, one can be lonely even in a crowd.

    Going away from home for work or for studies, joining a new school, moving home, serious problems in the family; all these can be challenging situations. If someone is shy or very anxious, has low self-esteem (doesn’t think much of himself), then he or she is more likely to avoid others and become lonely. On the other hand, some people are very aggressive, rude. They do not care for others. Obviously, nobody likes to be with them and they end up fending for themselves. What about social media? Have you come across someone who has plenty of online friends, but no one to play with? Can a virtual friend be a true friend? Internet, social media and online games eat up into all your free time, one hardly gets time to go out and make friends and one is left with no real friend.

     Being lonely can be miserable. When we are left alone, we feel excluded, sad and unwanted. There is an empty, hollow feeling within us. It breeds negativity. Moreover, these negative feelings slowly get accumulated and make the person bitter. And who would want to be friends with such a person! The result is a vicious cycle of more loneliness!

    Some of us cannot cope with loneliness and go into depression. When it becomes extreme, some even contemplate self-harm. Some deal with it in incorrect ways such as experimenting with smoking, drinking, drugs etc., whereas some take risky dares just to get into a group. It is even possible to get carried away by false sympathy and mistake it for love.

      When we do get lonely, we have to make special efforts to come out of it. Limiting the toxic use of social media and internet seems to help; so does exercise! Get into others’ shoes, find out the reason for their avoidance and try to correct it. Sometimes, there may be circumstances beyond our control and that can be frustrating. In such situations, accepting that ‘I need help’ is the first step. Talk to someone trusted. If that doesn’t work, take professional help, go to a counselor.

   A teenager once asked me if there is any sure shot formula to have lots of friends! There is no such magic wand. I can give you a few tips though. Be open, avoid judging people. Nurture a hobby. Focus on your goal. Don’t be too self-centered. In fact if we shift our focus to others, we might stop pitying ourselves and come out of the shell of loneliness. Be helpful. Most importantly, treat others exactly the way you want others to treat you!

   All said and done, let’s not forget that we need to be alone at least some time during the day; to have that precious ‘me’ time, to peep inside our mind. So, keep that loneliness at bay but don’t forget to enjoy your solitude!



  किशोरवय आणि जीवनकौशल्यं डॉ वैशाली देशमुख पूर्वप्रकाशित साप्ताहिक सकाळ समजा तुम्हांला कोशिंबीर करायची आहे. साधी टोमॅटो-कांद्याची. आणि...