लोकसत्ता व्हिवा
मागच्या लेखात आपण शचीचा डायलेमा पहिला. तपनबरोबर
लोणावळ्याला जाऊन आल्यानंतर तिच्या लक्षात आलं कि ती प्रेग्नंट आहे. आणि तपन आता प्रतिसाद
देत नाहीये.शचीनं काय बरं करायला हवं? आणि तपन? त्याचा काय रोल या सगळ्यात? तेव्हा
आपण सेफ सेक्सची व्याख्याही पहिली. प्रेग्नन्सी, लैंगिक आजार आणि शारीरिक अपाय
यापासून सुरक्षित रहाणे म्हणजे सेफ सेक्स. आज त्याविषयी बोलूया.
गर्भाशय मुलींमध्ये असतं म्हणून टेन्शन त्यांनाच येतं.
कारणकाही गुंतागुंत झाली तर ती निस्तरण्याची जबाबदारी प्रामुख्यानं मुलींवरच पडते.
पण प्रिकॉशन्स घेण्याची जबाबदारी दोघांनी घ्यायला हवी, नाही का? शिवाय गुंतागुंत
ही फक्त शारीरिकच नसते, मानसिकही असते.त्यामुळे प्रत्यक्ष मूल जरी होत नसलं तरीमुलगे
त्यात इन्व्हॉल्व्ड नसतात असं नाही..
सेफ सेक्स च्या पद्धती पाहू.गर्भनिरोधक गोळ्या हा प्रेग्नन्सी
टाळण्याचा एक उपाय. यात स्त्रियांमध्ये असणारी इस्ट्रोजेन, प्रोजेस्टेरॉन यासारखी हॉर्मोन्स
असतात. त्यांचा परिणाम होऊन स्पर्म्स गर्भाशयात आले तरी फलन होत नाही.हॉर्मोन्सच्या
या गोळ्या एकवीस दिवस रोज रात्री नियमानं घ्याव्या लागतात.उरलेले सात दिवस त्यात
लोहाच्या गोळ्या असतात.असे तीस दिवस गोळ्या घेऊन थांबायचं.साधारण महिना पूर्ण झाला
की पाळी सुरु होते. पाळीच्या पाचव्या दिवसापासून पुढचं पाकीट सुरु करावं लागतं.
अर्थातच या गोळ्या मुलींनी घ्यायच्या असतात. त्यातल्या हॉर्मोन्समुळे काही साईड
इफेक्ट्स होऊ शकतात. डोकेदुखी, पायावर सूज, मळमळ, उलट्या वगैरे. क्वचित काही वेळा रक्ताच्या
गुठळ्या होण्यासारखे काही गंभीर परिणाम होतात. दुसरी महत्त्वाची लक्षात
ठेवण्यासारखी गोष्ट म्हणजे यामुळे फक्त प्रेग्नन्सी टळते, पण लैंगिक आजारांचा धोका
तसाच राहतो. त्यामुळे पार्टनर एकच असेल किंवा त्याच्याविषयी खात्री असेल तर ठीक
आहे. ज्या मुली कधीतरी एखाद्याच वेळी शारीरिक संबंध ठेवतात, त्यांना नेहमी गोळ्या घ्यायचा धोका
पत्करण्याची गरज नसते.
दुसरा उपाय म्हणजे कंडोम्स. हे पुरुष पार्टनरनं वापरायचे असतात.रबराची ही लांबट
पिशवी स्पर्म्स तर अडवतेच पण लैंगिक आजारांनाही रोखते. कंडोम्स तात्पुरते आणि
बाहेरून वापरायचे असल्यामुळे त्यांचे काही साईड इफेक्ट्स नसतात.शिवाय ते ऐनवेळी
वापरले तरी चालतात. गोळ्यांसारखे महिनाभर घ्यायला हवेत असं नाही.
एक नक्की, यातला कुठलाही उपाय मूल न होण्याची शंभर टक्के गॅरंटी
देत नाही.शरीरसंबंधन ठेवणं हाच उपाय शंभर टक्के खात्रीचा.
पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला काय हवंय याविषयी
नीट विचार करून ठेवायला हवा. आंधळेपणानं शारीरिक संबंधांना सामोरं जाणं नक्कीच
टाळायला हवं. त्याच्याविषयी लाजून विचारच केला नाही किंवा आपल्याला कशाला या भानगडीत पडायला
हवं, आपण कशाला या वाटेला जाणार आहोत असा विचार करून काही माहितीच घेतली नाही, तर कसं कळणार काय करावं ते? कारण खूपदा या घटना अचानक, नकळत
आणि तयारीत नसताना घडतात.
मग, व्हायचं ना याविषयी जागं?
No comments:
Post a Comment