Tuesday, 31 October 2017

सकाळमधील परीक्षण





           
                         सकाळमधील परीक्षण.


My work is Important!!


   

Remember Napoleon? Once, during his travels, he came to a river with a small bridge. It was so narrow, that only one way traffic was possible. Just then, a man with a huge sack on his back started crossing the bridge from the other side. Napoleon’s soldiers obviously shouted at him to stop, so as to let the emperor pass first. But Napoleon stopped them. He believed in dignity of labor and let the man cross the bridge first! No wonder, this simple boy from an average background went on to become the emperor of France!

  This happened in France, about 200 years ago. But why go so far! We have our own father of the nation, Mahatma Gandhi, who was an avid proponent of dignity of labor. He would clean toilets, cut vegetables and wash his own clothes. Nobel peace prize winner Martin Luther King followed this philosophy and practiced it.

  All these great men had this one thing in common, they respected work! No work was too lowly for them.

  It’s not that we do not appreciate all this! We really do! But we still crave for white collared jobs. We judge a person as superior or inferior according to the type of work he or she does. We prefer unemployment to menial work. Just because someone has decided that these jobs are below someone’s dignity, we shun them. Don’t you think, we need to change this mindset?  Imagine the chaos that would ensue if the traffic police went on a mass leave, or if nobody picked up the garbage for a week! Isn’t it time we started appreciating every job? Are we to understand the importance of things only when the concerned workers go on a strike?

   Unless we take pride in whatever we do, we can’t do a good job and we cannot get work satisfaction either. The one thing that struck me about the western world was the way a sweeper or a waiter goes about his or her work. They do not hesitate to haul up even their superiors if they are spoiling their work! The confidence and the smile on their faces says it all!

   So my young friends, why don’t we start right at home and wash our dinner plates, clean the toilets once in a while or clean that cat litter!


                      

Wednesday, 18 October 2017

हो / नाही


  ‘मला खरंतर नाही म्हणायचं होतं.’ निराशेनं मन हलवत निशा म्हणाली. अमन आणि ती त्या दिवशी त्यांच्या मित्राच्या वाढदिवसाच्या पार्टीला गेले होते. परत येताना रात्र झाली. अमन तिला सोडायला आला होता. तो कॉफी प्यायला रुममध्ये आला. आणि तिथेच राहिला. त्याच्या दुस-या दिवशी निशा मला भेटायला आली होती. ‘मग का म्हणाली नाहीस तसं?’  ‘अगं त्याला काय वाटलं असतं? आणि गोष्टी अशा एका पाठोपाठ घडत गेल्या कि मला काही सुचलंच नाही.’ 
  
नीरजला त्याचं मन खात होतं. पुढच्या आठवड्यापासून फायनल्स होत्या. त्याला परीक्षेचं प्रचंड टेन्शन यायचं. काल अभ्यास करत असताना त्याचा चेहरा बघून आदित्यनं त्याला कसलीतरी गोळी दिली. तुझं टेन्शन एकदम पळून जाईल म्हणाला. ‘नको रे’, ‘घे रे’ अशा छोट्याशा वादावादीनंतर नीरजनं ती घेतली. नीरजला जाम झोप आली. आणि सकाळी उठल्यावर फ्रेश वाटायचं सोडून तो पूर्ण मरगळला. त्याचं डोकं दुखायला लागलं. ‘आपण काल घ्यायला नको होती ती गोळी.’ त्यानं शंभर वेळा स्वत:ला दोष दिला. 
  
आईबाबांच्या रोजच्या भांडणाला गार्गी कंटाळली होती. ‘ तुला ते इतके आवडत नसतील तर तू लग्न तरी का केलंस बाबांशी?’ तिनं आईला विचारलं. सुस्कारा सोडून आई म्हणाली, ‘काय करणार? नाही म्हणायची टाप नव्हती आमची आई-वडिलांसमोर. खरंतर मला पुढे खूप शिकायचं होतं. पण चांगलं स्थळ आलं म्हणून लावून दिलं त्यांनी लग्न!’ 
Image result for free clipart, dilemma 
  आपण सगळ्यांना आवडावं असं प्रत्येकालाच वाटतं. त्यात काही चुकीचं नाही. इन फॅक्ट, ब-याचदा त्यामुळेच नकार देववत नाही आपल्याला.  पण या लोकप्रियतेसाठी आपण कोणते मार्ग पत्करणार? कोणत्या थराला जाणार? घाई, धावपळ, चिडचिड हे सगळं ओझं घेणार का? घेतलेल्या निर्णयाबद्दल सतत पश्चाताप करत राहणार का? धोके पत्करणार का? कारण या ‘नाही’ म्हणता न येण्याचे फार मोठे परिणाम भोगायला लागतात कधी कधी. तुम्हाला या वयात आईवडिलांना, दोस्तांना, गर्लफ्रेंड किंवा बॉयफ्रेंडला, ड्रग्जना, अनोळखी लोकांना अशा अनेकांना ‘नाही’ म्हणायची वेळ येते. तुमचे आणि तुमच्या आईवडिलांचे लग्न, करियर, नोकरी, बाहेरगावी जाणे अशा अनेक बाबतीत मतभेद असू शकतात. त्या त्या वेळी आपली मतं योग्य प्रकारे, ठामपणे पटवून देता आली नाहीत तर गार्गी च्या आईसारखी रुखरुख लागून राहते. आयुष्यभर नकोसं काम करत बसायला लागतं. कायम आईवडिलांचा रागराग करत बसतो आपण. पण अनेकदा तुम्हाला स्वत:लाच स्पष्ट कल्पना नसते आपल्याला काय हवंय याची. त्यामुळे तुम्ही आपली बाजू त्यांना पटवून देऊ शकत नाही. 
   
सेक्शुअल रिलेशनशिपच्या बाबतीतही अनेकदा हा गोंधळ उडतो. निशा म्हणाली तसं मन नाही म्हणत असतं. शरीर मात्र आतुर असतं. कुणाचं ऐकावं ते समजत नाही. आणि नंतर जेव्हा त्याचे परिणाम भोगायची वेळ येते तेव्हा ब्रम्हांड आठवतं. आपण नाही का म्हणालो नाही वेळेवर? त्याचं कारण आपण आपल्या भावनांचा, आपल्यावर होणा-या परिणामांचा विचारच केलेला नसतो. विचार फक्त लोक काय म्हणतील याचा केलेला असतो. 
Image result for free clipart, saying no
   
        म्हणजे आधी आपल्याला नाही म्हणायचं की हो म्हणायचं याचा ठाम निर्णय घ्यायला लागेल. त्याच्या ब-यावाईट परिणामांचा नीट विचार करायला लागेल. त्यानंतर ते कसं, कोणत्या शब्दात सांगायचं ते ठरवायला लागेल. आणि मग ते प्रत्यक्षात करायला लागेल. आणि त्याहीनंतर त्या निर्णयावर उगीच विचार करत न बसता पुढच्या कामाला लागायला लागेल. म्हणजे असं नको व्हायला की आपण नकार तर देऊन बसतो पण मग वाटणार, ‘अरे, जायला हवं होतं आपण. आता सगळे तिकडे मजा करत असतील. उद्या आपल्याला जळवतील.’ त्यापेक्षा एकदा आपण नाही असा निर्णय घेतला कि मग त्यातल्या पॉझीटीव्ह बाजूवर लक्ष केंद्रित करायचं. त्या निर्णयामुळे आपला काय काय फायदा झाला आणि गेलो असतो तर काय तोटा झाला असता हे विचार मनात आणायचे. त्या मिळालेल्या रिकाम्या वेळात आपल्याला हवी असलेली दुसरी एखादी गोष्ट किंवा एखादं महत्त्वाचं काम करता येतं. तो वेळ सत्कारणी लावता येतो. नकोशा सवयींपासून स्वत:ला वाचवता येतं. भविष्यकाळावर परिणाम करणारे महत्त्वाचे निर्णय ठामपणे घेता येतात.
  नाही म्हणायला सुद्धा प्रॅक्टिस लागते. ती सवय ठेवणं, आपल्या विचारांमध्ये आणि निर्णयांमध्ये स्पष्टता असणं, लोकांच्या भावनांचा विचार करण्याबरोबर स्वत:च्या भावनांचाही विचार करणं हे सगळंच फार महत्त्वाचं आहे त्यासाठी. 

Published in व्हिवा लोकसत्ता ऑक्टो २०१७

A book review by Dr Vijaykumar Mane

टीन एज डाॕट काॕम #१..डाॕ.वैशाली देशमुख     पौगंडावस्थेतील मुलांमध्ये नैसर्गिक बदल घडत असतात.त्यामुळे ती स्वतः तर गोंधळून जातात अन् पालकांनाही गोंधळात टाकतात. मग या सर्वाना कोणीतरी हे बदल व्यवस्थित समजावून सांगायला हवेत ना..काळजी करु नका.आपल्याशी अगदी किशोर मित्र -मैत्रिणीप्रमाणे दिलखुलास  गप्पा  मारण्यासाठी आल्या आहेत पौगंडावस्थेतील मुलांच्या विशेषतज्ञ डाॕ.वैशाली देशमुख  टीनएज डाॕट काॕम#१ या पुस्तकाद्वारे.त्यानी संवादातून हा नाजुक व अवघड विषय उलगडून दाखवला आहे.लेखिकेची ही हातोटी खरोखरच वाखाणण्याजोगी आहे.पौगंडावस्थेतील प्रत्येक घटकाचा त्यानी सुक्ष्मपणे विचार करुन विस्तृत स्वरूपात वाचकांसमोर मांडला आहे.विषय सोपा करण्यासाठी अधूनमधून उदाहरणे दिली आहेत.आलोक यांच्या समर्पक व्यंगचित्रांमुळे पुस्तक  मनोरंजकही बनले आहे.लेखिकेने पौगंडावस्थेतील सर्व बाबींचा अर्थात शारीरिक व मानसिक बदल,आहार,व्यायाम इ.चा आढावा घेतला आहे.युवावर्गाचे आवडते विषय प्रेम व दोस्ती यालाही स्पर्श केला आहे.व्यसनांबद्दलही बरीच माहिती लेखिकेने दिली आहे.सर्वसाधारणपणे मुलांच्या मनात येणाऱ्या शंकांचे निरसन त्यांनी केले आहे.पौगंडावस्थेतील मुलांच्या समस्यांची गुरुकिल्ली म्हणजे जीवनकौशल्ये..त्याचा उल्लेख लेखिकेने केला आहे.त्याचा खोलवर परामर्श घेणे कदाचित जागेअभावी शक्य झाले नसावे.तीच गोष्ट पालकांच्या भूमिका विषद करताना झाली असावी.किंवा पुढच्या भागात तो  मांडण्याचा लेखिकेचा मानस असावा.खरंतर एवढा मोठा विषय हाताळताना वाचकांच्या मर्यादेचा  (अन् तोही किशोरवयातील) विचार लेखिकेने केला आहे.  शास्त्रीय माहिती देताना रेखाचित्रांचा वापर संयुक्तिक ठरला असता.प्रत्येक लेखातील ठळक गोष्टीं वेगळ्या अक्षरांद्वारे दाखवण्याची कल्पना छानच! .फक्त त्या  गडद अक्षरात वा चौकटीत दाखवल्या असत्या तर आणखी उठावदार झाल्या असत्या. कठीण विषयाची माहिती सोप्या पध्दतीने सादर करुन  एक माहितीप्रधान वाचनीय  व अभ्यासनीय पुस्तक वाचकांच्या हाती सोपवल्याबद्दल लेखिका डाॕ .वैशाली देशमुख यांचे  तसेच  राजहंस प्रकाशनचे खूप खूप अभिनंदन तसेच डाॕ .वैशाली देशमुख यांच्या पुढील लेखन प्रवासासाठी  आभाळभरुन शुभेच्छा !...डाॕ .विजयकुमार स.माने

Monday, 16 October 2017

  किशोरवय आणि जीवनकौशल्यं डॉ वैशाली देशमुख पूर्वप्रकाशित साप्ताहिक सकाळ समजा तुम्हांला कोशिंबीर करायची आहे. साधी टोमॅटो-कांद्याची. आणि...